Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    युवकांना सक्षम बनविणारी वैयक्तिक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना.. वाचा सविस्तर

    June 5, 2025

    समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    June 5, 2025

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन

    June 3, 2025
    Facebook X (Twitter)
    Monday, July 7
    Facebook X (Twitter) Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर,दौंड ,इंदापूर,कर्जत व करमाळा तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी.
    ताज्या बातम्या

    उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर,दौंड ,इंदापूर,कर्जत व करमाळा तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी.

    Samrudha NagarBy Samrudha NagarMarch 5, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    इंदापूर समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : पुणे, अहिल्यानागरसह सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर आला आहे. जसजशा उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत, तशी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढू लागली आहे. उपसा सिंचन, उन्हाळी आवर्तन व पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याच्या व भीमानदीपात्रातून भरमसाठ पाणी सोडण्यात येत आहे .परिणामी, उजनी धरण्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. त्यामुळे उजनी जलाशयातील पाण्याचे तातडीने व काटेकोरपणे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. दरम्यान, दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी टाहो फोडतात, परंतु यश येत नाही. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार असलेली कालवा सल्लागार समिती नेमके करते काय? याप्रश्नी शेतकरीवर्ग सध्या आक्रमक आहे.


    यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिरायती भागासह बागायती क्षेत्रातील शेतकरी सुखावला होता. गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरीवर्ग सध्यातरी समाधानी आहे.परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात उजनी धरणाच्या पाणी पातळीत कमलीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आला आहे . या परिस्थितीमुळे ऐन उन्हाळ्यात उजनीच्या पाण्याचा उन्हाळा होण्यास उशीर लागणार नाही अशा प्रकारची चिंता उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना वाटत आहे.

    दौंड तालुक्यातील भीमा नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने उजनी धरणग्रस्त शेतकरी चिंताग्रस्त आहे . उपसा सिंचन, कालवा सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचे योग्य व फेरनियोजन करणे गरजेचे आहे . याप्रश्नी दौंड ,इंदापूर,कर्जत व करमाळा तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    कर्जत नगरपंचायतीतील सत्ताकारणाने घेतले वेगळे वळण.

    April 30, 2025

    दुध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

    February 26, 2025

    सांघिक भावनेतून प्रशासनात सक्षम व कार्यक्षम टीम तयार व्हावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

    February 13, 2025

    Comments are closed.

    Our Picks

    युवकांना सक्षम बनविणारी वैयक्तिक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना.. वाचा सविस्तर

    June 5, 2025

    समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    June 5, 2025

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन

    June 3, 2025

    गौणखनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    May 24, 2025
    © 2025 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.