Author: Samrudha Nagar

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ३ हजार २८७ लाभार्थ्यांना २७ कोटी ९६ लाखांचे वितरण युवकांना सक्षम बनविणारी वैयक्तिक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना अहिल्यानगर, दि.५ – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ८ हजार ४०२ लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आली. त्यापैकी ३ हजार २८७ लाभार्थ्यांची प्रकरणे बँकेने मंजुरी केली आहेत. या लाभार्थ्यांना २७ कोटी ९६ लक्ष ६६ हजार रुपयांचे कर्ज बँकेमार्फत मंजूर करण्यात आले आहे. या कर्जापोटी लाभार्थ्यांना कर्ज प्रकरणांचा व्याज परतावाही महामंडळामार्फत देण्यात आला आहे, अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमोल बोठे यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकातील, प्रामुख्याने…

Read More

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इगतपुरी येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. ५ : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला.…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन समृद्ध नगर न्यूज , दि. ३: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील ‘उमेद सावित्री’ या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन विकास मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, आमदार जगदीश मुळीक, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी…

Read More

गौणखनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल, नोंदणी व मुद्रांकसह भूमिअभिलेख विभागाचा घेतला आढावा समृद्ध नगर न्यूज नेटवर्क नाशिक दि. २४ : गौण खनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. पाणंद रस्ते मुक्त करीत शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आज सकाळी मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, व उपविभागीय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा (नाशिक), डॉ. पंकज आशिया (अहिल्यानगर),…

Read More

“नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून ‘कन्व्हिक्शन रेट’ वाढवावा” समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली येथे, ‘सांगली जिल्हा पोलीस’ आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना निर्देश दिले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी. त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून ‘कन्व्हिक्शन रेट’ वाढवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. खटल्यांमधून आरोपी निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून, त्यातील त्रृटी दूर कराव्यात. आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाण्यांचा आढावा घेत, यातील त्रृटी दूर कराव्यात. त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी. ई-समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे…

Read More

पारंपरिक कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’ला जिल्ह्यात गती ७ हजार ६३२ कारागिरांना प्रशिक्षण ; ५०४ कारागिरांना बँक कर्ज वितरित समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि. २३ – भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने’ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ७ हजार ६३२ पारंपरिक कारागिरांना १५ प्रशिक्षण केंद्रांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी ५०४ कारागिरांना बँकांमार्फत कर्ज वितरित करण्यात आले असून उर्वरित लाभार्थ्यांच्या कर्ज प्रक्रियेस गती देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बालासाहेब मुंडे यांनी दिली. ही योजना पारंपरिक कलेचा सन्मान राखत कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य प्रदान करणारी आहे. देशाच्या सांस्कृतिक व औद्योगिक परंपरेला बळकटी देणाऱ्या…

Read More

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न सुरत – चेन्नई आंतरराष्ट्रीय महामार्गालगतच्या जागेवर औद्योगिक क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क उभारल्यास जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि.९ – सुरत ते चेन्नई हा १ हजार ६०० किलोमीटर लांबीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग असून त्यापैकी सुमारे ४८१ किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून जाणार आहे. या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार आहे. या रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने जागा संपादन करून औद्योगिक क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क उभे केल्यास पाचही जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ३२६ कोटी…

Read More

कर्जत नगरपंचायत सत्ताकारण – जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल उच्च न्यायालयाने फेटाळला नव्याने निर्णय घेण्याचे दिले आदेश कर्जत, ता. ३० – कर्जत नगरपंचायतीतील गटनेता बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता फेटाळला, परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय उच्च न्यायालयाने अमान्य केला असून नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्ताकारणाने आज आणखी वेगळे वळण घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जत नगरपंचायतीतील सत्तेची रस्सीखेच सुरु आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील नगरपंचायतीतील काही नगरसेवकांनी बंड पुकारून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गोटात सामील झाले आणि विद्यमान नगराध्यक्षा सौ. उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला. या…

Read More

समाजाचा, देशाचा, विश्वकल्याणाचा विचार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष SAMRUDDH NAGAR NEWS – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या आजच्या एकसंघ भारताचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला जाते. यंदा आपण संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाल्याने अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. “He was nation builder.” देश तयार करण्याकरिता, देशाचा पाया तयार करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले,…

Read More

जामखेड शहराचा जुना प्रारुप विकास आराखडा रद्द करा आणि नवा आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आदेश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – जामखेड शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जामखेडच्या जुन्या प्रारुप विकास आराखड्यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी आज विधानभवनात झालेल्या बैठकी दरम्यान दिले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक झाली.…

Read More