Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»वाचा सविस्तर गहू पिकाचे खत पाण्याचे नियोजन.
    ताज्या बातम्या

    वाचा सविस्तर गहू पिकाचे खत पाण्याचे नियोजन.

    Samrudha NagarBy Samrudha NagarDecember 29, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter
    filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: null; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4194304;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 239.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 42;

    योग्य पाणी-खत व्यवस्थापनातून गहू उत्पादनात वाढ, वाचा सविस्तर गहू पिकाचे खत पाण्याचे नियोजन.
    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
    गव्हाचे पीक जोमदार येण्यासाठी केवळ खतांचा अतिरेक न करता पाणी व खत यांचे योग्य नियोजन आणि अचूक वेळ साधणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीमुळे अनेकदा खतांचा अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, शास्त्रीय पद्धतीने पाणी व खत व्यवस्थापन केल्यास गहू उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य आहे.


    गव्हाच्या पेरणीनंतर साधारण १५ ते २० दिवसांनी, जमीन वाफसा स्थितीत आल्यानंतर पहिले पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या टप्प्यावर पिकाला दिलेली विश्रांती मुळांची वाढ वाढवते आणि फुटवे जोमाने येण्यास मदत करते. घाईने पाणी दिल्यास अपेक्षित फुटवे येत नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.


    पीक २० ते २१ दिवसांचे झाल्यानंतर खताचा पहिला व सर्वात महत्त्वाचा डोस द्यावा. महागडी मिश्र खते वापरण्यापेक्षा युरिया व झिंक सल्फेटचा संतुलित वापर अधिक परिणामकारक ठरत आहे. एकरी १ बॅग युरिया (४५ किलो) व ५ किलो झिंक सल्फेट दिल्यास पिकाची शाकीय वाढ जोमदार होते. युरियामुळे वाढीस चालना मिळते, तर झिंकमुळे पिकाला हिरवेगारपणा येऊन फुटव्यांची संख्या वाढते.


    खत देताना होणारी मोठी चूक म्हणजे खत टाकल्यानंतर उशिरा पाणी देणे. यामुळे उन्हामुळे युरिया वाया जातो व पिकाला फक्त २० ते २५ टक्केच लाभ मिळतो. खत टाकल्यानंतर दोन तासांच्या आत पाणी दिल्यास खताचा पूर्ण लाभ पिकाला मिळतो. आधी काही वाफ्यांमध्ये खत टाकून तात्काळ पाणी सोडणे ही योग्य पद्धत ठरते.


    गव्हाला ५० ते ५५ दिवसांनी, तिसऱ्या पाण्याच्या वेळी दुसरा डोस देणे उपयुक्त आहे. यावेळीही एकरी १ बॅग युरिया व ५ किलो झिंक देण्याचा सल्ला देण्यात येतो. खत टाकणे शक्य नसल्यास नॅनो युरिया (५ मिली प्रति लिटर) व झिंक (१ ग्रॅम प्रति लिटर) एकत्र करून फवारणी केल्यास कमी खर्चात चांगला परिणाम मिळू शकतो.
    गव्हासारख्या प्रमुख पिकासाठी गरज नसताना महागडी खते वापरण्याऐवजी योग्य वेळी युरिया व झिंकचा समतोल वापर केल्यास खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ साधता येईल, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.